किल्यावर_तब्बल_४७०_वर्ष_जुना_शिलालेख.
इ स १५४८. साली कोरलेला शिलालेख हतगड किल्ल्यावर असून किल्ल्या हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास चा उजव्या बाजूला राणीचा बाग म्हणून एक आडवाट आहे त्या ठिकाणी असून तब्बल ४७० वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाची उंची ४फूट उंच २.४इच रुंद असून सोळा ओळींचा शिलालेख असून पहिल्या १४ओळी संस्कृत आणि शेवटच्या २ मराठी म्हणजेच संस्कृत+प्राकृत अशा भाषेत हा शिलालेख आपल्याला बघायला मिळेल.
बागलानच्या बागुल घरान्याच तब्बल ३५०वर्ष राज्य या किल्य्यावर होत.निजामशाहीतील निजाम घराण्यातील सर्वात मोठा राजा बुऱहान निजामशहा यांच्या कडून बागुल घराण्यातील भैरवसिंग राजाने हा किल्ला वेढा घालून इ. स १५४८ साली आपल्या ताब्यात घेतला असा ह्या शिलालेखात उल्लेख आहे.
पण जवळपास आता ५०० वर्ष होत असलेला हा शिलालेख आता झिजत चालला असून महाराष्ट्रातील किल्यांच्या इतिहासातील देवनागरी लिपीत कोरलेला हा सर्वात मोठा शिलालेख हतगड किल्ल्याचा असावा असे इतिहास अभ्यासकांचे मत असून या त्याचे जतन करून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment